भादवी कलम ३३२ व ३५३ मध्ये केलेली दुरुस्ती रद्द करण्याची मागणी
पिंपरी : भारतीय दंड संहिता कलम ३३२ व कलम ३५३ मध्ये केलेली दुरूस्ती अन्यायकारक असून ही दुरुस्ती रद्द करण्यात यावी. अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत भीम संग्राम सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राहुल वडमारे, आनंद साळवे, कैलास परदेशी, मिलिंद तायडे, बाळासाहेब कांबळे, उमेश वागमारे, सुभाष विद्यागर, नसरिन शेख, महीला आघाडी शहराध्यक्षा संगिता रोकडे, पुणे जिल्हा महीला आघाडी अध्यक्षा अर्चना कोळी यांनी निवेदनात म्हटले आहे की, ०७ जुन २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय दंड संहितेच्या धारा ३३२ व ३५३ बाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्या प्रमाणे भारतीय दंड संहिता कलम-३३२ व कलम-३५३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या प्रमाणे कलम-३५३ हा अजामीनपात्र करण्यात आला. तसेच दोन वर्षांच्या शिक्षेऐवजी पाच वर्षाचा कालावधी वाढवण्यात...










