Tag: Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा
पिंपरी चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस तर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. शिवरायांच्या संदर्भात असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे. दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधी मध्ये ही प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न होणार आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिवप्रेमींना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे आपले जीवनमान उंचावले आहे. त्यातील एक भाग म्हणजे सोशल मिडीयाचा समाजावर निर्माण झालेला प्रभाव, याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. तरूणाई सोशल मिडीयाच्या आभासी जगात भरकटून जाताना दिसत आहे. या तरू...
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र देवून पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र देवून पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान

लोणावळा, दि.१३ (लोकमराठी) - लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुष्छ देवून हॉटेल चंद्रलोक येथे पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे. प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो. गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो. म्हणून अशा पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (आयपीएस) सत्य साई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संजय जाधव,पोलीस पाटील शहाजहान इनामदार,पोलीस पाटिल ह.भ.प अनंता श...
मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने तळेगाव दाभाडेत हिंदू जनगर्जना मोर्चा; विविध संस्था, संघटना व सर्व राजकीय पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे

मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने तळेगाव दाभाडेत हिंदू जनगर्जना मोर्चा; विविध संस्था, संघटना व सर्व राजकीय पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग

मावळ दि:१३ (लोकमराठी)- मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे दि.१२ रविवार रोजी हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणजे फाल्गुन अमावस्या'धर्मवीर दिन' जाहीर करावा, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांच्या विरोधात कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी व्हावी,या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वतननगर येथील श्री संतोषीमाता मंदिरापासून या मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात राम कृष्ण हरी… जय श्रीराम…हर हर महादेव…पवनपुत्र हनुमान की जय… जय भवानी, जय शिवाजी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय… भारत माता की जय… असा जयघोष करण्यात येत होता. नागरिक हातात भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. लहान मुले, तरुणवर्ग, ज्येष्ठ ना...
मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र, मोठी बातमी

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत

मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी, दि.12 (जिमाका) : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यांच्या ...
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द
पुणे, मोठी बातमी

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

पुणे, दि. ८ फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेचे शिक्षक नेते संभाजीराव शिरसाट व इतर सहकार-यांवरील शासकीय कामात अडथळा प्रकरणी दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सध्यास्थितित महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे येथे कार्यरत असलेल्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक पुणे येथे शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना २०१७ साली हा गुन्हा दाखल केला होता. या संपुर्ण प्रकरणाची माहिती अशी की, २०१७ मध्ये शिवसेनेचे शिक्षक नेते संभाजीराव शिरसाट व इतर सहकारी शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. पुणे या कार्यालयात गेले होते. कार्यालयामध्ये गेल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व शिक्षक पदाधिकारी त्या कार्यालयातून निघून गेले. मात्र, त्यावेळेस नंतर संभाजीराव शिरसाट व इतर सहकारी यांच्यावर शैलजा...
चाफनाथ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
सामाजिक

चाफनाथ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

चाफनाथ : माता रमाई यांची जयंती मौजे चाफनाथ येथे उत्साहात साजरी करण्यात आली. नांलदा बुद्ध विहार सभासदांच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पूर्व संध्येला प्रवचनकार गुलाबराव अहिरे यांचे प्रवचन झाले. जयंतीच्या दिवशी सकाळी पंचशील ध्वजारोहण गुलाबराव अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण बुद्ध वंदना घेण्यात आली व माता रमाई (Mata Ramai) यांच्या जीवनावर प्रवचन देण्यात आले. या कार्यक्रमाचा समस्त बौद्ध अनुयायी उपस्थित राहुन आस्वाद घेतला. हा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर बलखंडे, नामदेव बलखंडे, भानुदास बलखंडे, मनोहर पुंडगे, पुष्पा पुंडगे, लता रामजी बलखंडे, कपील बलखंडे यांनी परिश्रम घेतले. ...
प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट 
शैक्षणिक, पुणे

प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी व शिक्षकांनी प्रादेशिक मानसिक रुग्णालय येरवडा येथे भेट दिली. सदर भेटीमध्ये सर्व विदयार्थ्यांना रुग्णालयाची परिपूर्ण माहिती रुग्णालयाचे सामाजिक अधिकारी मोहन बनसोडे यांनी दिली. रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया, नवीन कायद्या संदर्भातील माहिती, तसेच रुग्णांची दैनंदिन दिनचर्या याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. रुग्णांसाठी उपचार पध्दती कोणत्या स्वरूपात दिल्या जातात उदा: डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, स्पंज थेरपी याची माहीती दिली. तसेच त्या रुग्णांना उपचार पद्धती कशा प्रकारे उपयोगी पडते यांची माहीती दिली. रुग्णालयामध्ये असलेल्या महिला रुग्ण व पुरुष रुग्ण यांचे विकृती संदर्भात : वर्तन कसे होते. यांची माहिती दिली. त्यांना दिला जाणारा आहार आणि त्यांचे वेळापत्रक यांची माहिती दिली. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री. अंकुश कारकर यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी दोन्ही सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या. भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री.अंकुश कारकर यांनी नोकरीला नोकरी न समजता रयत शिक्षण संस्थेत सेवा म्हणून काम केले. हे रयतेचे दोन्ही गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट येथील प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या विद...
१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन
महाराष्ट्र

१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन

रायगड, दि.४ (लोकमराठी) - १८ फेब्रुवारीला "मराठ्यांची गौरवगाथा" महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.(निर्मित/ लिखित/ दिग्दर्शित )प्रवीण नंदकुमार देशमुख यांनी शिवदुर्ग मित्र प्रस्तुत "मराठ्यांची गौरवगाथा" या महानाट्याची अधिकृत घोषणा केली. २फेब्रुवारी १६६१ रोजी कर्तलबखानाच्या बलाढ्य सैन्याचा छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांच्या सैन्याने गनिमी कावा या युद्धनीतीने संपूर्ण पराभव केला त्यांना शरणागती पत्करायला लावली व शिवाजी महाराजांचा मोठा विजय झाला म्हणूनच २फेब्रुवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षी ३६२ वा विजय दिन सोहळा उंबरखिंडीमध्ये साजरा करण्यात आला. याचे आयोजन पंचायत समिती खालापूर, जिल्हा परिषद, तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले याच दिवसाचे औचित्य साधून शिवदुर्ग मित्र प्रस्तुत प्रवीण नंदकुमार देशमुख (निर्मित/ ...
खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात
सिटिझन जर्नालिस्ट

खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात

ज्योत्स्ना राणे राज्यात गेल्या काही दिवसांपासुन बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात मोठा बद्दल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन धुके पडु लागले आहे. शेतकर्‍यांना शेती पिकांवर औषध फवारणी करण्याची वेळ आलेली आहे. द्राक्ष बागाही अडचणीत आल्या असुन पहाटेपासुन द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्ग औषध फवारणी करु लागला आहे. काद्यांवरही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे शेती पिकीवर करपा रोग येऊ नये, यामुळे मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करावी लागते. परिणामी अधिकचा खर्च शेतकर्‍यांना करण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामाव खात्याकडुन राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होण्याची...