CHINCHWAD : गेली १५ वर्षे भोईरनगर बसथांब्यापासून वंचित
चिंचवड : दळवीनगर आणि भोईरनगर येथील रस्त्यावर कायम वर्दळ असते. भोसरी आणि हिंजवडी येथे आणि कॉलेजला जाण्यासाठी रस्त्यावर कायम गर्दी असते. मात्र, गेली १५ वर्षापासून या ठिकाणी बसथांबा नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हापावसात रस्त्यावर जीव मुठीत घेऊन थांबावे लागेल. त्यामुळे या ठिकाणी बसथांबा उभारण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधारचे शहराध्यक्ष माधव धनवे पाटील यांनी केली आहे.
याबाबत माधव धनवे पाटील यांनी लोकमराठी न्यूजला माहिती देताना सांगितले की, निगडीच्या दिशेने जाणाऱ्या बसला गेले १५ वर्षे बस स्टॉपच नाही. बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. जेष्ठ नागरिक आणि विध्यार्थी उन्हातान्हात, पावसात बसची वाट पाहत असतात. त्यात येथील रस्ता ६० फुटांपेक्षा जास्त रुंद असल्याने आणि रस्त्याला दुभाजक नसल्याने वाहने भरधाव असतात. त्यामुळे बसची वाट पाहत रस्त...