महाराष्ट्र

येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण
महाराष्ट्र, मनोरंजन

येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण

रघुवीर खेडकर करणार नेतृत्व मुंबई : करोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेली असतानाही राज्य सरकारने एका नवा पैशाची मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २१ सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय लोककलावंतानी घेतला आहे. https://youtu.be/th25g1lz5xI महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही. चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही. अशी खंत ह्या कलावंतांची आहे. म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनेनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु अद्...
चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मोठी बातमी, महाराष्ट्र

चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शे...
संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र, मोठी बातमी

संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल

पत्रकारांना हेतुपुरस्सर गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाईची एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जालना : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार असून ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे. त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ए...
मटका व्यावसायिकाचा मुलगा झाला नायब तहसिलदार
महाराष्ट्र

मटका व्यावसायिकाचा मुलगा झाला नायब तहसिलदार

बारामती : कष्ट आणि जिद्द असेल तर यशाला गवसणी घालणे अवघड नसते ही बाब बारामतीच्या विक्रांत कृष्णा जाधव याने सिध्द करुन दाखवली आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विक्रांतने नायब तहसिलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. वडीलांच्या वेगळ्या व्यवसायाची पार्श्वभूमी असतानाही त्याने अत्यंत जिद्दीने अभ्यास करत हे यश साकारले. विक्रांतचे वडील कृष्णा जाधव हे अनेक वर्षे मटक्याच्या व्यवसायात कार्यरत होते. घरची परिस्थिती प्रतिकूल होती तरी कृष्णा जाधव यांना आपल्या मुलाने सरकारी अधिकारी बनावे अशी मनोमन इच्छा होती. त्याने त्याचे करिअर घडवावे व उच्चपदस्थ अधिकारी बनावे या साठी त्यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य केले. वडीलांसोबतच सर्व कुटुंबिय व मित्रांचीही साथ असल्याने विक्रांतनेही शासकीय अधिकारी बनण्याचे मनावर घेतले व अभ्यासास प्रारंभ केला. दिवसातील अनेक तास अभ्यासावर त्याने लक्ष क...
नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह निरिक्षकांच्या लाचखोर टोळीवर एसीबीची कारवाई
महाराष्ट्र, मोठी बातमी

नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह निरिक्षकांच्या लाचखोर टोळीवर एसीबीची कारवाई

सातारा : कचरा उचलण्याऱ्या ठेकेदाराची डिपोझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या उपमुख्याधिकाऱ्यासह तीन निरिक्षकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने (एसीबीने) सोमवारी (ता. 8) कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ, वर्ग -२ (वय 33 वर्ष, सातारा नगरपरिषद रा. फोर्ट व्हिव्ह बी १3, १०० केसरकर पेठ सातारा, मूळ रा. रिया बी रायकरनगर धायरी, पुणे-४१), प्रविण एकनाथ यादव (वय ५१ वर्ष, आरोग्य निरीक्षक, रा . ३२२ धादमे कॉलनी, करंजे पेठ सातारा), गणेश दत्तात्रय टोपे (वय ४3 वर्ष, स्वच्छता निरीक्षक , रा .१२८ यादोगोपाळ पेठ सातारा), राजेंद्र कार्यगुडे (आरोग्य निरीक्षक रा .१७२ / २ एसटी कॉलनीचे पाठीमागे सातारा) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीने दिलेल्...
महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित | एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांची माहिती
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित | एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र सरकारने माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित केले असल्याची माहिती, नॅशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी लोकमराठीला दिली. एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने सुरक्षा कवच देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे होते. मुंबईत ५३ मिडिया कर्मी कोरोना बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्रने एक व्हिडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते. अगदी कोरोना टाळेबंदीच्या सुरवातीलाच प्रसार माध्यम व्यवस्थापन व मालकांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्याचे व तसे आवाहन सरकारने करण्याचे निवेदन दिले होते. मात्र जेव्हा मुंबईत ५३ जन कोरोना पाँझिटिव निघाले तेव्हा देशभरातील मिडिया जगत हादरले. तेव्हा या प्रकरणी माध्यमकर्मी बाधित कसे झाले, याची चौकशी व्हावी तसेच ...
लक्ष्मीबाई नारायण जगधने यांचे निधन
महाराष्ट्र

लक्ष्मीबाई नारायण जगधने यांचे निधन

अहमदनगर : मुळेवाडी (ता. कर्जत) येथील रहिवासी लक्ष्मीबाई नारायण जगधने (वय ९०) यांचे रविवारी (ता. २४) रात्री नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली व नातुंडे-परतुंडे असा प्रपंच असून मुळेवाडी ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी नारायण जगधने, लाला नारायण जगधने, हिरामण नारायण जगधने, मंदा सत्यवान गायकवाड आणि मिलन राजू कांबळे यांच्या त्या मातोश्री, तर पत्रकार रविंद्र संभाजी जगधने यांच्या त्या आजी होत. लक्ष्मीबाई यांचा स्वभाव मनमिळाऊ व दायाळू होता....
महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात
राजकारण, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात

राज्यातील भाजप नेत्यांची निष्ठा महाराष्ट्राशी नाही, दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतभाजप नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह करू नये मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, 'कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली होती, पण त्य...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एस टी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले, विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रकाअभावी या शहरांमध्ये थांबून होते. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबामधून असल्यामुळे अश...
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होणार मोफत डाळ वाटप
मोठी बातमी, महाराष्ट्र

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होणार मोफत डाळ वाटप

मुंबई : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरडाळ मोफत वाटप केली जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत डाळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला अ...