Tag: Marathi News

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन
आरोग्य, पिंपरी चिंचवड

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन

चिंचवड : मंथन फाउंडेशन, रिलीफ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण केंद्र, पुणे, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघवी केशरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिंचवड येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यात आली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्याख्यान दिले. युवक युवती यांना एचआयव्ही म्हणजे काय? एड्स व एचआयव्ही मधील फरक समजून सांगितला. एचआयव्ही कसा होतो, त्याचा इतिहास यावर माहिती दिली. तसेच एचआयव्ही चाचणी सर्व सरकारी रुग्णालय व काही एचआयव्हीवर काम करणाऱ्या संस्था मोफत तपासणी करतात व त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घेतली पाहिजे, ती काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एचआयव्हीबाबत युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. संवेदनशील झाले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षित राहून, जीवन...
कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
महाराष्ट्र, मोठी बातमी

कामगारांना ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई दि ८ :विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थाला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करू नये,असे निर्देश सहकार व पणन मंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे,महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार,सहायक निबंधक अहमदनगर शरीफ शेख ,सहायक निबंधक सोलापूर श्री.माने, एपीएमसी चे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील,माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील,कि...
नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण

पिंपरी : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutation) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.‍ दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकुण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर ‍तिघे त्यांचे निकटसहवासित आहेत.नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्य...
प्रशासनविरोधात मोठ्या जनआंदोलनचा निर्धार; दफनभूमी प्रश्नी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

प्रशासनविरोधात मोठ्या जनआंदोलनचा निर्धार; दफनभूमी प्रश्नी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

दफनभूमीच्या मागणीसाठी मुस्लिम बांधव सरसावले; परिसरातील सर्व मस्जिद प्रमुखांची बैठक थेरगाव : दफनभूमीच्या प्रश्नवर थेरगाव येथील मक्का मस्जिद मध्ये थेरगाव ,काळेवाडी ,वाकड परिसरातील सर्व मस्जिद मधील प्रमुखांची बैठक अयोजित करण्यात आली होती. मागील २५ वर्षांपासून परिसरातील नागरिक दफनभूमीची मागणी करीत आहेत. अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देणेबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरात मुस्लिम कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची मयत झाल्यास त्याला जागा उपलब्ध नाही , चिंचवड च्या दफनभूमीमध्ये खोदकाम करताना सांगाडे आढळून येतात. त्यामुळे प्रेतांची विटंबना व अवहेलना होत आहे. या बैठकीमध्ये दफनभूमी प्रश्नी शासनाविरोधात लढा देण...
महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांच्या उर्मटपणा व मुजोरीला बसणार चाप | जागृत नागरिक महासंघाचा प्रस्ताव मान्य

जनतेसाठी अभिप्राय फॉर्म ठेवण्याचे मा आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश पिंपरी : मनपामधील विविध कार्यालयांमध्ये नागरिकांना अधिकाऱ्यांचा उर्मटपणा मुजोरपणा अनुभवास येतो, बरेचदा अधिकारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात, असले तरी नागरिकांची भेट नाकारतात. त्यांना तासन तास ताटकळत ठेवतात. त्याअनुषंगाने राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांनी सार्वजनिक प्राधिकरणाणे अभ्यागतांना अभिप्रायासाठी फॉर्म ठेवण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात जागृत नागरिक महासंघाच्या नितीन यादव, उमेश सणस, राजेश्वर विश्वकर्मा व अशोक कोकणे या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील यांची दि एक नोव्हेंबर 2021 रोजी समक्ष भेट घेऊन त्यांना कोकण खंडपीठाच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. जागृत नागरिक महासंघाच्या निवेदनावर व्यापक समाजहित लक्षात घेत, अतिशय सकारात्मक प्र...
संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात – अॅड. सतीश कांबीये
पिंपरी चिंचवड

संविधान किती ही चांगले असले, तरी राज्यकर्ते त्याचा गैरवापर करतात – अॅड. सतीश कांबीये

चिंचवडगाव : संविधान किती ही चांगलं असले, तरी राज्यकर्ते त्याचा वापर नीट करीत नाहीत. त्यांच्या मदतीला पत्रकारिता व न्याय व्यवस्था असल्याने संविधानाचा गैरवापर केला जातो. मात्र, संविधानाबाबत जनजागृती केल्यास संविधानाचा गैरवापर टाळता येऊ शकतो. असे प्रतिपादन संविधान अभ्यासक अॅड. सतीश कांबीये यांनी येथे केले. येथील प्रबुद्ध संघाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून संविधान अभ्यासक अॅड. सतीश कांबीये होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात अणुराधा सोनवणे यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर सोनवणे हे होते. त्याप्रसंगी नगरसेवका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, डांगे पाटील यांच्यासह प्रबुद्ध संघाचे सभासद व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी...
‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित
सामाजिक

‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित

लोकमराठी न्यूज नेटवर्क : प्रा. डॉ. शरद गायकवाड लिखित नवा ग्रंथ 'प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा' नुकतंच छापून आलं आहे. या पुस्तकात इतिहासाच्या पानात दडलेल्या २२ महाण व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला गायकवाडांनी प्रकाशात आणले आहे. सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, फुले-आंबेडकरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, नामांतराची चळवळ, कला-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे प्रतिभावंत नायक, अशा अनेकांचा परिचय या पुस्तकातून होतो आहे. साहित्य आणि सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम करणारे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचा हा ग्रंथ विकत घेवून त्यांच्या लेखनाला पाटिंबा देणे हे मातंग समाजातील शिक्षीत लोकांचे आद्य कर्तव्य आहे, आणि मातंग समाज हा ग्रंथ घेणार, हा मातंग साहित्य परिषदेचा विश्वास आहे. या नव्या पुस्तकाचे मातंग साहित्य परिषद स्वागत करीत आहे. अशी प्र...
काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : काळेवाडीतील एमएम महाविद्यालयालगतच्या छत्रपती चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशाने आपल्या हृदयात अनेक वीर पुत्राची यशोगाथा कित्येक शतकापासून जतन केलेली आहे. हे वीर पुत्र आपल्या पावन भूमीत जन्माला आले, हे आपले केवढे सौभाग्यच. या महान विभुतींच्या वीरगाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात, आणि त्यांच्या काळात आपण जन्माला आलो असतो. तर त्यांचे कर्तृत्व डोळ्यांनी पाहता आले असते. असे विचार मनाला स्पर्शून जातात. आपल्या महाराष्ट्रात असाच एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी राजा होवून गेला. अखंड भारतवर्षांत आपल्या कर्तृ...
संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी
पिंपरी चिंचवड

संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी

पिंपरी : अखेर आज केंद्र सरकाने तीन काळे कृषी कायदे रद्द केले.हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे.भारताच्या लोकशाहीचाही हा ऐतिहासिक विजय आहे.आज संपूर्ण जगाला भारतातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले की, शांततापूर्ण व लोकशाहीमार्गाने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे शेतकरी आंदोलन सर्वात मोठे व दिर्घकाळ चाललेले आंदोलन होते.सरकारने आपली सर्व शक्ति पणाला लावून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा ध्यास घेतला होता.परंतू त्या दडपशाहीपुढे शेतकऱ्यांचा दृढनिश्चय अजिंक्य ठरला.या लढ्यात शेकडोंना प्राण गमवावे लागले.लाखो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणूनच हा संघर्ष भविष्यातील अनेक लोकशाहीविघातक शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कृषी कायदे मागे घेणे ही भाजपाची राजकीय खेळी असली तरी अंतिमत: भारतीय लोकशाहीचा विजय झाला आहे, अशी प्र...
मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात
मोठी बातमी, राष्ट्रीय

मध्यप्रदेश शासनातर्फे इंदोरमध्ये शुद्ध मराठी अभिव्यक्ती कार्यशाळा उत्साहात

लोकमराठी न्यूज नेटवर्क इंदोर : मध्यप्रदेश शासनाच्या मराठी साहित्य अकादमी आणि मुक्त संवाद साहित्यिक समिती, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १४ नोव्हेंबर) इंदोर येथे मराठी भाषकांसमोर 'शुद्ध मराठी अभिव्यक्ती' या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत सहभागी मराठी भाषकांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, अक्षरभारतीचे अध्यक्ष व पुण्यातील मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू यांना पाचारण करण्यात आले होते. महाराष्ट्रापासून दूर अमराठी प्रांतात जिथे हिंदी भाषेचा प्रभाव आहे, अशा वातावरणात राहणाऱ्या मराठी भाषकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहून ही कार्यशाळा त्यांच्यासाठी एकप्रकारची पर्वणीच होती, असे जाणवले. गेली अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ११ वर्षे मुक्त संवादच्या माध्यमातून मराठी बांधवांसाठी अशा प्रकारचे उपक्...