सरकारने तृतीयपंथीयांवर अन्याय केल्यास, सरकार विरोधात सुप्रिम कोर्टापर्यंत न्याय मागणार
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, दि. ४ डिसेंबर २०२२ : राज्यभरात अनेक तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, पण राज्य सरकारने पोलिस भरतीत आवश्यक कोणतेही बदल न केल्याने त्याना अर्ज दाखल करता आलेला नाही. तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसकडून तृतीयपंथीयांचा स्वतंत्र सेल स्थापन करत संघटन केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅग्रेसने क्रांतीकारक पाऊल उचल तृतीयपंथी समाजातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतू, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामावून घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तृतीयपंथीयांना पोलिस भरती प्रक्रियेत सामावून न घेतल्यास राष्ट्रवादी काॅग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल.
समाजाच्या मुख्य प्रवाहात...