मोठी बातमी

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
मोठी बातमी, राष्ट्रीय

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने जाहीर केली आकडेवारी नवी दिल्ली : देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरून ही बाब उघड झाली आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली. त्यामध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता. वर्ष २०१७ मध्ये १२ हजार २४१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1215180050418421760 यापूर्वी एजाजच्या मुलीला अटक करण्यात आली होती. खोटा पासपोर्ट बनवून पळून जायच्या बेतात असलेल्या त्याच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, ...
ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”
मोठी बातमी, महाराष्ट्र

ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा मुंबईमध्ये आजपासून “माणदेशी महोत्सव”

यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी मुंबईकरांना साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभवलोककलावंत भारुडकार चंदाताई तिवाडी प्रेक्षकांना करणार भारुडाने मंत्रमुग्धमृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदीलोकसंगीत, लोकनृत्य, गझी लोकनॄत्य, यांचा आस्वादमहिला कुस्त्याचा आनंद मुंबई : माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. गावाकडील संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी या महोत्सवात येऊन आनंद घ्यावा अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्ष...
कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले

वल्लभनगरमधील हिरामोती वाईन्स दुकानातील प्रकार पिंपरी चिंचवड : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांना मद्य विक्रीच्या दुकानात दुकानमालकाने डांबून ठेवले. हा प्रकार वल्लभनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील हिरामोती वाईन्स शॉपी येथे शुक्रवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास घडला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुकानमालक संतोष रमेश शिरभाते (वय 46) आणि रमेश शिरभाते (वय 65, दोघे रा. वल्लभनगर, पिंपरी) यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनिल हरिश चौहान (वय 54, रा. प्राची अपार्टमेंट, आनंद सिनेमा शेजारी, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ...
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा
महाराष्ट्र, मोठी बातमी

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीने भरुन त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कमसुद्धा या योजनेसाठी पात्र असेल. या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख महत्तम मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल. मार्च ...
भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे
महाराष्ट्र, मोठी बातमी

भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे

पुणे : "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही," असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी या परिषदेत जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं मत या अधिवेशनात मांडू, असं ते यावेळी म्हणाले. "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरून आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही." असे राज ठाकरे एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज देशात जी दंगलसदृश परिस्थिती आहे. त्या करणाऱ्या किती लोकांनी ही स्थिती माहिती आहे. देशातल्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष उडवण...
पुण्यातील गहुंजे बलात्कार, खून प्रकरणात राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात
मोठी बातमी, महाराष्ट्र

पुण्यातील गहुंजे बलात्कार, खून प्रकरणात राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात

फाशी रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नसल्याचा युक्तिवादविनंती पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वीकारण्याचे सरन्यायाधीशांना साकडे मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वाधिकारे स्वीकारावे, अशी विनंतीही आयोगाने केली आहे. “फाशी रद्द करणे म्हणजे पीडितेला न्याय नाकारणे आणि तसा अधिकार उच्च न्यायालयाला नाही,” असा युक्तिवाद आयोगाने केला आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देशाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांना पाठविलेल्या या पत्रामध्ये गहुंजे बलात्कार व खून प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेण्याची विनंती केली ...
धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)
पुणे, मोठी बातमी

धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)

तर दुसऱ्या घटनेत सर्पमित्राने नागांना दिले जीवनदान; दोन्हीही घटना पुण्यातील एका घटनेत वेगवेगळ्या सर्पमित्रांना एक बदनाम करणारा तर, दुसरा निसर्ग वाचविणारा पुणे (लोकमराठी) : एका सर्पमित्राने नागरिकांनी पैसे कमी दिल्याने पकडलेला साप व त्याच्याजवळील साप पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिल्याची घटना सोमवारी (ता. २५) हडपसरमध्ये घडली. तर या उलट काळेेवाडीत एका सर्पमित्राने जाळीत अडकलेल्या नागाची सुटका करत नागाला जीवनदान दिले. या दोन्हीही घटना पुण्यातील आहेत. पहिली घटना हडपसरमधील असून साप दिसल्याने स्थानिकांनी सर्पमित्र राजेंद्र परदेशी याला कॉल केला. सर्पमित्र घटनास्थळी आला आणि धामण जातीचा बिनविषारी साप पकडला. ठराविक कॉल चार्ज 200 रुपये असतो राजेंद्र ने 300 रुपयांची मागणी केली. त्यामुळे स्थानिकांनी 100 रुपये कमी दिल्याचा राग डोक्यात घेत दुसरीकडे पकडलेला नाग जातीचा विषारी साप आणि तेथे पकडलेल...
राजकीय भूकंप : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मोठी बातमी, महाराष्ट्र, राजकारण

राजकीय भूकंप : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई (लोकमराठी) : आज सकाळी राज्यात मोठा भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न मावळले आहे. दरम्यान, आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी आपले व्टिटर आकाऊंटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रि...
महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची निवड
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची निवड

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्या सांगवीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला. त्यांना 41 मते पडली. ढोरे 40 मतांनी विजयी झाल्या. उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. दरम्यान, अपक्षांनी भाजपला मतदान केले. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. तर, निलेश बारणे, प्रमोद कुटे गैरहजर राहिले. मनसेचे सचिन चिखले आणि अपक्ष नवनाथ जगताप देखील गैरहजर राहिले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या पक्षाच्या माई ढोरे यांची महापौरपदी आणि तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी निवड होणार असल्याचे उमेदवारी अर्ज दाखल...